गरीब कुटुंबांना विशेष अर्थसहाय्य अनुदानाचे होणार वाटप

रावेर, प्रतिनिधी । तालुक्यातील गरीब कुटुंबाना राज्य व केंद्र सरकार कडून विशेष अर्थसहाय्य (सानुग्रह) अनुदान मे आणि जून महिन्यांची वाटप करण्यात येणार असल्याची माहीती तहसिल प्रशासनाने दिली आहे.

केंद्र व राज्य सरकारतर्फे विशेष अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता विविध योजनेतील लाभार्थ्यांना विशेष अर्थसहाय्य अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे. यात इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना, इंदिरा गांधी अपंग निवृत्ती योजना,या सर्व योजनांतील लाभार्थ्यांना मे आणि जुन या दोन्ही महिन्यांचे प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे १००० रुपये (सानुग्रह) विशेष अर्थसहाय्य अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती तहसिल प्रशासनाने दिली आहे.

Protected Content