कोरोना : ४ राज्यांत केंद्राची पथके जाणार

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. केंद्र सरकार आता अॅक्शन मोडमध्ये आले दिल्लीतील एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी या वाढीचा अभ्यास करण्यासाठी पथकांची निर्मिती केली आहे. ही पथके राज्यांचा दौरा करून अहवाल सादर करतील.

दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये रुग्ण वाढत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. दिल्लीत तर पुन्हा लॉकडाउन सुरू करण्याबाबत सरकार विचार करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील परिस्थिती पाहून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अनेक आवश्यक त्या सूचना केल्या. आता दिल्लीतील एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया देखील विविध राज्यांमध्ये काही पथके पाठवण्याची तयारी करत आहेत.

ही पथके हरयाणा, राजस्थान, गुजरात आणि मणिपूरचा दौरा करतील. एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया तीन सदस्यांच्या पथकाचे नेतत्व करतील. हे पथक हरयाणाचा दौरा करेल. या व्यतिरिक्त डॉक्टर व्ही. के. पॉल (नीती आयोगाचे सदस्य) राजस्थान, डॉक्टर एस. के. सिंह (एनसीडीसीचे संचालक) गुजरात पथकाचे नेतृत्व करतील. या व्यतिरिक्त, उपमहासंचालक डॉ. स्वस्तिचरण हे मणिपूरच्या पथकाचे नेतृत्व करतील.

दिल्लीला लागून असलेल्या एनसीआर भागात देखील रुग्ण वाढत आहेत, ही पथके राज्यांमधील विविध जिल्ह्यांचा दौरा करतील आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांना मदत करतील. या बरोबर ही पथके पॉझिटीव्ह रुग्णांचा अभ्यास करतील आणि कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलतील.

Protected Content