कोरोना : रेल्वे प्रशासनाकडून १७ रेल्वेगाड्या रद्द !

 

भुसावळ (प्रतिनिधी) देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. गर्दीमुळे यास अधिक प्रोत्साहन मिळते. त्यामुळे रेल्वे प्रशासनातर्फे सतरा रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे नागपूर आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.

 

डाउन लोकमान्य टिळक -अजनी एक्सप्रेस २३ ते ३० मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे. (११२०२) अप अजनी – लोकमान्य टिळक वाया नांदेड मनमाड २० ते २७ मार्चपर्यंत रद्द, (११४०१) डाउन मुंबई-नागपुर नंदीग्राम एक्सप्रेस २३ मार्च ते १ एप्रिल पर्यंत रद्द. (११४०२) अप नागपुर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस २२ ते ३१ मार्चपर्यंत रद्द. (११४१७) डाउन पुणे-नागपुर हमसफर एक्सप्रेस २६ मार्च ते २ एप्रिल पर्यंत रद्द. (११४१८) अप नागपुर-पुणे हमसफर एक्सप्रेस २० ते २७ मार्चपर्यंत, (१२११७) डाउन लोकमान्य टिळक -मनमाड गोदावरी एक्सप्रेस १८ ते ३१ मार्चपर्यंत, (१२११८) अप मनमाड – लोकमान्य टिळक गोदावरी एक्सप्रेस १८ ते ३१ मार्च, (२२१३९) डाउन पुणे-अजनी एक्सप्रेस २१ ते २८ मार्च, (२२१४०) अप अजनी -पुणे एक्सप्रेस २२ ते २९ मार्च, (२२२२१) डाउन मुंबई- हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस २०, २३, २७ आणि ३० मार्चला रद्द करण्यात आली आहे. (२२२२२) अप हजरत निजामुद्दीन – मुंबई राजधानी एक्सप्रेस २१, २४, २६ आणि ३१ मार्च. (१२२६१) डाउन मुंबई-हावडा दुरंतो एक्सप्रेस २५ मार्च आणि १ एप्रिल रोजी रद्द आहे. (१२२६२) अप हावडा-मुंबई दुरंतो एक्सप्रेस २४ आणि ३१ मार्च. ( २२१११) डाउन भुसावळ -नागपुर इंटर सिटी एक्सप्रेस वाया इटारसी १८ ते २९ मार्चपर्यंत, ( २२११२) अप नागपुर -भुसावळ इंटर सिटी एक्सप्रेस वाया इटारसी १९ ते ३० मार्च दरम्यान रद्द राहील. तर(११२०५) डाउन लोकमान्य टिळक-निजामाबाद एक्सप्रेस वाया मनमाड २१ आणि २८ मार्च. (११२०६) अप निजामाबाद-लोकमान्य टिळक एक्सप्रेस वाया मनमाड २२ आणि २९ मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे.

Protected Content