कोरोनाच्या परिस्थितीत आरोपींना अटकच करणे बंद करणार का? ; आशिष शेलारांचा सवाल

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाच्या  परिस्थितीत  आरोपींना अटकच करणे बंद करणार का? असा सवाल शेलार यांनी केला आहे.

 

राज्यातील तुरंगात कैदी ठेवण्याची क्षमता संपली असल्याने कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता या पुढे अत्याआवश्यक असेल तरच आरोपींना अटक करावे, असे आदेश कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी बजावलेले आहेत.

 

भाजपा नेते आशिष शेलार यांनी या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “ अर्जुन सकपाळ या तरुणाने बोगस IAS प्रमाणपत्र मिळवून रत्नागिरीत जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्याचा बनाव रचला. बनावट अहवाल तयार करुन भांडूपच्या ड्रीम माँलमध्ये सनराइज हाँस्पिटलला अग्निशमन दलाची परवानगी घेतली गेली   अतिरिक्त पोलीस महासंचालक ( कारगृह) यांनी डीजीपींना पत्र लिहून विनंती केली आहे की, छोट्या गुन्ह्यातील नवीन आरोपी अटक करणे थांबवा! तिन्ही घटना गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आहेत.” असंही शेलार यांनी सांगितलं आहे.

 

 

अशा किती गोष्टी बोगस करुन सामान्य माणसे फसवली जाणार आहेत? कोरोनाच्या लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का? प्रशासन, कायदा सुव्यवस्था, राज्याचा शासकीय कारभार अशा प्रकारे ठाकरे सरकार संपूर्णत: गाठोड्यात बांधून ठेवणार आहे की काय?” असे सवाल देखील शेलार यांनी ठाकरे सरकारला उद्देशून केले आहेत.

 

 

राज्यातील ४६ कारागृहांची बंदिवान ठेवण्याची क्षमता २३ हजार २१७ एवढी असून सद्याच्या स्थितीमध्ये ३४ हजार ८९६ कैदी आहेत. क्षमतेपेक्षा ११ हजार ६७९ कैदी अधिक आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कारागृहात संसर्ग वाढू शकतो असे लक्षात आले असल्याने आरोपीची अटक अत्यावश्यक असेल तरच करा, असे निर्देशित करण्यात आले आहे.

 

Protected Content