कोणाच्याही बापात महाराष्ट्रातील सरकार पाडायची हिंमत नाही : संजय राऊत

 

मुंबई (वृत्तसंस्था) कोणाच्याही बापात महाराष्ट्रातील सरकार पाडायची हिंमत नाही, अशा शब्दात मध्य प्रदेशातील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

यावेळी संजय राऊत यांनी आमदारांची फोडाफोडी करणाऱ्या भाजप नेत्यांना फैलावर घेतले. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्वत:हून राजीनामा दिला, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, कोरोनासारखे संकट समोर असताना आमदारांची अशाप्रकारे फोडाफोडी करणे योग्य नाही, असे राऊत यांनी म्हटले. महाराष्ट्रात असे काहीही घडणार नाही. कोणाच्याही बापात महाराष्ट्रातील सरकार पाडायची हिंमत नाही, असे राऊत यांनी सांगितले.

Protected Content