कृषी कायद्यांमधून अब्जाधीश मित्रांचा फायदा- प्रियंकांचा हल्लाबोल

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । मोदी सरकारने कृषी कायदे हे मित्रांसाठी असल्याचे दर्शविण्यात आले असले तरी यातून अब्जाधीश मित्रांचा लाभ होणार असल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वधेरा यांनी आज टीकास्त्र सोडले आहे.

केंद्र सरकारने अलीकडेच संमत केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले आहेत. हे आंदोलन अधिकच चिघळत चालल्याचं दिसत आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापाठोपाठ काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

या संदर्भात आज प्रियंका गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकारवर टीका केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, नाव शेतकरी कायदा मात्र संपूर्ण फायदा अब्जाधीश मित्रांचा. शेतकरी कायदा शेतकर्‍यांशी चर्चा न करता कसा बनू शकतो? त्यामध्ये शेतकर्‍यांच्या हिताकडे कसे दुर्लक्ष केले जाऊ शकते? सरकारला शेतकर्‍यांचे म्हणने ऐकावे लागेल. या सर्वजन मिळून शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ आवाज उठवू असं काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आपल्या या ट्विटद्वारे म्हटलं आहे.

या ट्विटसोबत त्यांनी आंदोलक शेतकर्‍यांची व्यथा मांडणारा एक व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे. ज्यामध्ये, सरकारकडे आमची मागणी आहे की, आपल्या अधिकारांचा वापर करणार्‍या शेतकर्‍यांविरोधात हिंसा व अत्याचार बंद करा. शेतकर्‍यांचा आवाज व त्यांच्या व्यथा ऐका असं सांगण्यात आलेलं आहे.

Protected Content