कानळदा रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । किनगावहून कानळदा येथे दुचाकीने जात असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत २१ वर्षीय तरूण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली असून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, सागर मधुकर कोळी (वय-२१) रा. किनगाव ता. यावल हा शेती काम करतो. शेती कामाच्या निमित्ताने २६ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील कानळदा येथे मित्रांसह दुचाकीने जात असतांना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत सागरचा जागीच मृत्यू झाला तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला होता. वैद्यकिय अधिकारी डॉ. सचिन अहीरे यांच्या खबरीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद शिंदे करीत आहे.

Protected Content