औरंगाबादेत आज दिवसभरात ५८ रुग्णांची वाढ ; कोरोनाग्रस्तांची सांख्य पोहचली ९०० वर !

 

औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबाद शहरात आज सकाळी ३० तर दुपारनंतर २८ अशा एकूण ५८ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा ९०० वर पोहोचला आहे.

 

आज पॉझेटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये यामध्ये कैलास नगर (१), चाऊस कॉलनी (१), मकसूद कॉलनी (२), हुसेन कॉलनी (४), जाधववाडी (१), न्यू बायजीपुरा, गल्ली नं.३ (१), एन सहा, संभाजी कॉलनी, सिडको (१), कटकट गेट (१), बायजीपुरा (१०), अमर को- ऑपरेटिव्ह सोसायटी, एन आठ, सिडको (२), लेबर कॉलनी (१), जटवाडा (१), राहुल नगर (१) आणि जलाल कॉलनी (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये १६ पुरुष आणि १२ महिला रुग्णांचा समावेश असल्याचेही प्रशासनाने कळविले आहे. दुसरीकडे अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे औरंगाबाद शहरातील संजय नगर परिसरातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा हा तब्बल १०६ वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे हा परिसर औरंगाबाद शहरातील अतिसंवेदनशील परिसर बनला आहे.

Protected Content