उध्दव ठाकरेंमुळे राज्य अधोगतीला जाईल-राणे

narayan rane

पुणे प्रतिनिधी । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे अनुभवशुन्य असून त्यांच्या कारकिर्दीमुळे राज्य अधोगतीला जाईल असे सांगत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

पुण्यात सॅटरडे क्लबच्या कार्यक्रमात खासदार नारायण राणे यांच्यासह खासदार श्रीनिवास पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी महापौर अंकुश काकडे, निवेदक सुधीर गाडगीळ तसेच विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते. यावेळी निवेदक सुधीर गाडगीळ यांच्याशी संवाद साधतांना नारायण राणे यांनी नाईट लाईफ बद्दल आपली भुमिका मांडली. ते म्हणाले की, मुंबईकरांनी कधीही नाईट लाईफ मागणी केली नव्हती. मात्र, मुख्यंमत्र्यांकडून चिरंजीवांच्या हट्टापायी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा हट्ट पुरवण्याऐवजी त्यांनी राज्यातील इतर प्रश्‍न सोडवावेत, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिला. उद्धव ठाकरे कधी मुख्यमंत्री होतील, असे वाटले नव्हते. कारण त्यांना मुख्यमंत्रीपदाची कधीही महत्वकांक्षा नव्हती. त्यांना प्रशासकीय बाबींची काहीही माहिती नाही. ते एक अनुभव शून्य व्यक्ती आहेत, त्यामुळे राज्य अधोगतीकडे जाईल, अशा शब्दांत भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

Protected Content