आपल्या सैनिकांना शहीद होण्यासाठी निशस्त्र पाठवले का? : राहुल गांधींचा मोदींना सवाल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आपल्या सैनिकांना शहीद होण्यासाठी निशस्त्र पाठवले का?, असा सवाल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे. लद्दाख येथील गलवान खोऱ्यातील चीनसोबतच्या झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत.

 

 

येथील गलवान खोऱ्यातील चीनसोबतच्या झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या सैनिकांना शहीद होण्यासाठी निशस्त्र पाठवले का? असा सवाल त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी शहीद जवानांचा उल्लेख करत ट्विट केले की, आपल्या निशस्त्र सैनिकांची हत्या करण्याची चीनची हिंमत कशी झाली? आपल्या सैनिकांना शहीद होण्यासाठी निशस्त्र पाठवण्यात आले का? दरम्यान, बुधवारी देखील राहुल यांनी पंतप्रधान यावर शांत का? आता खूप झाले. काय झाले हे जाणून घेण्याची आपल्याला गरज आहे. आपल्या सैनिकांची हत्या करण्याची चिनची हिंमतच कशी झाली? आपल्या भूमीवर कब्जा करण्याची त्यांची हिंमत कशी झाली?, अशा प्रश्नांची सरबत्ती राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली होती.

Protected Content