आजाराला कंटाळून विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । दुर्धर आजाराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आज सकाळी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील बळीराम पेठेत घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आशा सुनिल कुमावत (वय-३९) रा. बळीराम पेठ यांना गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांनी दुर्धर आजार जडला होता. त्यांच्यावर नाशिक येथील तज्ञ डॉक्टरांचे औषधोपचार सुरू होते. त्याचे पती सुनिल नानासाहेब कुमावत हे पाटबंधारे विभागात शिपाई म्हणून नोकरीस आहे. आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास कामाला निघून गेले. तर मुलगा हा शाळेत गेला होता. सततच्या आजाराला कंटाळून सकाळी १० वाजेच्या सुमारास घरात गळफास घेवून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाताच शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह आणण्यात आला. याप्रकरणी सुनिल कुमावत यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप बडगुजर करीत आहे.

Protected Content