आजाराला कंटाळून वयोवृध्द महिलेची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

यावल प्रतिनिधी । यावल-भुसावळ रोडावरील शेताच्या विहिरीत आजाराला कंटाळून ६० वर्षीय वयोवृद्ध महिला विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या संदर्भातील पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, उषाबाई दिगंबर करांडे (वय-६०) रा. महाजन गल्ली, यावल यांनी आज रविवारी ५ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास यावल भुसावळ रोडवरील महाराष्ट्र ढाब्याजवळ असलेल्या कमलाकर सोनू करांडे रा. यावल यांच्या मालकीच्या शेतातील विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. महिलने उडी घेतांन शेत मालकानं संपर्क साधून पोलीसांना घटनेची माहिती दिली. शेत मालकाचा मुलगा राजेश कमलाकर करांडे याने पोलिसांना खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे. दरम्यान यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता मरण पावलेल्या उषाबाई करांडे यांना दम्याच्या आजाराने ग्रासले होते. त्यामुळे या आजारामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली व पती असा परिवार आहे.

Protected Content