रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धनगर समाजाचा सर्वांगीण विकाससाठी आम्ही नेहमी प्रर्यत्नशील आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी धर्मरक्षणासाठी देशात काम केले आहे.त्यांची प्रेरणा महीलांनी घेऊन त्यांचे विचार जनसामान्य पर्यंत पोहचविला पाहीजे. असे प्रतिपादन नंदकिशोर महाजन यांनी केले. रावेरात विश्ववेध फाऊंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला सन्मानाने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना गौरवण्यात आले.
यावेळी खा. रक्षाताई खडसे, भाजपा जेष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, प्रल्हाद पाटील, पद्माकर महाजन, धनगर समाज संर्घष समितीचे प्रदेशध्यक्ष संदीप सावळे, रावेर कृषी उपन्न बाजार समिती संचालक जयेश कुयटे, डॉ प्रीती सावळे, धनगर समाज संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष गोपाळ चोरामुले, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, रावेर शिक्षक संवर्धकचे अध्यक्ष प्रकाश मुजुमदार, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, पंचायत समिती माजी उपसभापती सुनिल पाटील, प्रहार जनशक्तीचे गणेश बोरसे भाजपा तालुका सरचिटणीस पंचायत समिती जुम्मा तडवी, अमोल पाटील, शितल पाटील, लखन सावळे, दिपक सावळे, दिलीप सोनवणे, देविदास बाविस्कर, चंद्रकांत वैतकर, सुरेश सोनवणे, चिंधा नेमाने, सुधाकर सुतार, धीरज हिवराळे यांच्यासह यावेळी मोठ्या संखेने धनगर समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रमुख उपस्थिती असलेल्या खासदार रक्षाताई खडसे यांनी मागील नऊ वर्षात अपेक्षीत विकास कामे झाली नसल्याने त्यांच्या बद्दल उपस्थित नागरीकांमध्ये नाराजीची कुजबुज होती.