अशोक गेहलोत बहुमत सिद्ध करण्याच्या तयारीत ; राज्यपालांची घेतली भेट

जयपूर (वृत्तसंस्था) राजस्थानातील राजकीय घडामोडींमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. गेहलोत बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी राज्यपाल कलराज मिश्र यांची भेट घेतली असून १०३ आमदारांच्या समर्थनाचे पत्रही दिल्याचे वृत्त आहे,

 

 

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राज्यपालांना राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. तसेच येत्या बुधवारी विशेष विधानसभा अधिवेशन बोलवण्याची इच्छा बोलून दाखवल्याचे वृत्त स्थानिक प्रसार माध्यमांनी दिले आहे. अशोक गहलोत शनिवारी सांयकाळी राज्यपालांची भेट घेत १०३ आमदारांचे समर्थन असल्याचे पत्र दिले आहे. पण, अद्यापपर्यंत राजभवनाकडून ही फक्त एक सदिच्छा भेट होती, असे सांगण्यात आले आहे. मात्र, राज्यपाल आणि गहलोत यांच्या भेटीमुळे राजस्थानमध्ये वेगवेगळ्या राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी १०३ आमदारांचा पाठींबा असल्याचा दावा केला आहे. यामध्ये काँग्रसचे ८८ आमदार आहेत. याशिवाय एक अपक्ष आणि बीटीपी दोन आणि सीपीएम दोन आरएलडी एक अशा आमदारांचा समावेश आहे.

Protected Content