अर्णब आजही ” आतच ” ; उद्या सुनावणी

 

मुंबई: वृत्तसंस्था । वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या गुन्ह्यात अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आजही मुंबई हाटकोर्टात अंतरिम दिलासा मिळाला नाही.

गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर आता उद्या दुपारी १२ वाजता पुढील सुनावणी होणार आहे. उद्या केवळ अंतरिम दिलासाविषयी सुनावणी घेऊ, असे स्पष्ट संकेत खंडपीठाने दिले आहेत.

आपल्याविरोधातील एफआयआर रद्द करण्यात यावा तसेच तत्काळ आपल्याला जामीन मिळावा, यासाठी अर्णब यांच्यावतीने हायकोर्टात धाव घेण्यात आली आहे.अर्णब यांच्या याचिकेवर काल झालेल्या सुनावणी वेळी तक्रारदार आज्ञा नाईक, सरकारी पक्ष आणि पोलिसांची बाजू ऐकूनच निर्णय दिला जाईल, असे कोर्टाने नमूद केले होते. सुनावणी आज ठेवण्यात आली होती.

आज दुपारी ३ वाजता कोर्टात सुनावणी सुरू झाल्यानंतर अर्णब गोस्वामी यांच्यावतीने हरिश साळवे यांनी युक्तिवाद केला. सुमारे दोन तासांपेक्षा अधिक वेळ सुनावणी चालली. त्यानंतर ‘आज सुनावणी पूर्ण करणे आम्हाला शक्य होणार नाही. त्यामुळे उद्या दुपारी ११ वाजता आम्ही पुन्हा सुनावणी ठेवू, असे नमूद करत कोर्टाने अर्णब यांना आज कोणताही अंतरिम दिलासा दिला नाही.

‘अशाप्रकारच्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाला अनुच्छेद २२६ अन्वये असलेल्या विशेष अधिकारांतर्गत फौजदारी दंड संहितेच्या कलम ४३ अन्वये आरोपीला तात्काळ सुटका करण्याचा आदेश देण्याचे पूर्ण अधिकार आहेत. हवे तर हायकोर्ट आवश्यक त्या अटी घालून गोस्वामींची सुटका करू शकते’, असा युक्तिवाद हरिश साळवे यांनी गोस्वामी यांच्यावतीने केला. अलिबागच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात प्रथमदर्शनी जे निरीक्षण नोंदवले आहे. त्याचा आधार घेऊन हायकोर्ट गोस्वामी यांच्या सुटकेचा आदेश तात्काळ काढू शकते, असेही साळवे यांनी नमूद केले.

Protected Content