अमृता फडणवीस यांना भाजपा पक्ष टेकओव्हर करायचा आहे का? ; शिवसेनेचे संघाला पत्र

मुंबई (वृत्तसंस्था) राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या अमृता फडणवीस यांना आवरा. अमृता फडणवीस यांना भाजपा पक्ष टेकओव्हर करायचा आहे का?,असा प्रश्न एका पत्राद्वारे शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांना विचारला आहे.

 

अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. आदित्य ठाकरे यांचा जो उल्लेख अमृता फडणवीस यांनी केला होता. त्याचा निषेध करत किशोर तिवारी यांनी हे पत्र लिहिले आहे. तिवारी यांनी पत्रात म्हटलेय की, देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस या दोघांनाही राजकीय आगपाखड करण्यापासून आवरा. अमृता फडणवीस यांना भाजपा हा पक्ष टेक ओव्हर करायचा आहे का? अमित शाह, नितीन गडकरी यांच्या यांच्या पत्नी कुणावरही टीका करत नाहीत. सीतेने रावणाला शिव्या दिल्याचे ऐकिवात नाही जे काही करायचे ते राम, लक्ष्मण आणि हनुमान यांनी केले. अमृता फडणवीस यांच्या वर्तनामुळे २०२४ मध्ये भाजपाला नुकसान होऊ शकत. अगदी . अमृता फडणवीस यांनी केलेले ट्विट हे अशोभनीय आहे.

Protected Content