अन्न व्यावसायिकांनी तळलेल्या तेलाचा पुनर्वापर टाळावा; अन्न व औषध प्रशासन

जळगाव, प्रतिनिधी | प्रतिदिवस ५० लिटरपेक्षा अधिक वापर असणाऱ्या अन्न व्यावसायिकांनी तेल साठ्याची माहिती ठेवावी व  वतळलेल्या तेलाचा पुनर्वापर टाळावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी म्हटले आहे, खाद्य पदार्थ तळण्यासाठी वापरण्यात येणारे तेल हे फक्त एकदाच तळणासाठी वापरावे. त्यानंतर पुढील दोन दिवसांत या तेलाचा वापर करून संपवावे. जर ते आपण पुन्हा तळण्यासाठी वापरले, तर त्यातील पोलर कंपाऊंडचे व ट्रान्सफॅटचे प्रमाण वाढून ते आरोग्यावर विपरीत परिणाम करते. मुख्यत्वे सर्व वयोगटातील लोकांना तळलेले पदार्थ हे आकर्षित करतात. मुख्यत्वे कचोरी, समोसा, भजे, वडे, पाणीपुरी यासारख्या अन्न पदार्थाची मोठी मागणी असते. हे खाद्यपदार्थ सहज उपलब्ध असतात. अन्न पदार्थ तळण्याकरीता वापरले जाणारे तेल हे पुन्हा- पुन्हा तळण्यासाठी वापरले गेले. तर त्यामध्ये पोलर कंपाऊंडस व बॅड कोलेस्टेरॉल ट्रॉन्सफटचे प्रमाण वाढून त्यापासून हृदयविकार, कोलोन कॅन्सरचा धोका असतो. तसेच पंचनसंस्थेसंबंधी विकार उदभवण्याचा धोका असतो. त्यामुळे खाद्ययतेल पुनर्वापराबाबत काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. खाद्य तेलाचा तळण्यासाटी वापर करताना गॅस हा कमी आचेवर ठेवा म्हणजेच तेलामधून धूर येणार नाही याची काळजी घ्यावी. तळण्यासाठी शक्यतो स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर करावा, लोखंडी कढईचा वापर टाळावा. तळताना तेलात जमा झालेले अन्न कण हे वारंवार तळून काळे होण्यापूर्वीच लगेचच काढावेत. तळलेल्या तेलाचा पुनर्वापर टाळावा. शिल्ल्की राहिलेले तेल हे पुढील दोन दिवसातच भाजीला फोडणी घालण्यासाठी वापरुन संपवावे. लहान- मोठ्या अन्न व्यवसायिकांनी म्हणजे ज्यांचा तेलाचा वापर प्रतिदिन ५० लिटरपेक्षा जास्त आहे. अशा व्यावसायिकासाठी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र शासन या विभागामार्फत राबविल्या जाणा-या अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत काही नियम आहेत. मोठ्या अन्न व्यावसायिकांनी ते दररोज वापरत असणा-या तेलाचे रेकार्ड ठेवणे आवश्यक आहे. तसेच वापरुन किती तेल शिल्ल्क, शिल्लक राहिलेले तेलाची विल्हेवाट कशी लावली किंवा शिल्लक तेल हे कोणत्या नोंदणीकृत बायेडिझेल उत्पादकाला दिले. त्यासंबंधी पूर्ण नोंदी ठेवणे आवश्यक आहे. तसे न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्याचप्रमाणे तळण्यासाठीचे खाद्यतेलाचा पुनर्वापरावर निर्बंध घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या जिल्हा कार्यालयामार्फत संबंधित अन्न व्यावसायिकांकडे जावून तपासणी करण्यात येते. टीपीसी मीटरच्या साह्याने तळण्यासाठी वापरत असलेल्या तेलाची तपासणी करुन जर टीपीसी हे २५ टक्यांपेक्षा जास्त असेल तर अन्न व्यावसायिक पुढील कायदेशीर कारवाईस पात्र ठरतात, असेही सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन यांनी म्हटले आहे.

Protected Content