अंजदा-रावेर रस्त्यावरील पुलावरून ट्रक पालटला : दोघांचा मृत्यू

रावेर, प्रतिनिधी । केळी भरून रावेरकडे येणारा ट्रक अजंदा -रावेर रस्त्यावरील पुलावरुन खाली नाल्यात पलटी झाल्याने त्याखाली दबुन दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, केळी भरून रावेरकडे येत असलेला ट्रक क्र आरजे १७ जि १०८० हा रात्री अजंदा रावेर रस्त्यावरील नविन विश्रामगृहाच्या मागे असलेल्या नाल्यावरील पुलावरुन पलटी खाऊन खाली पडला. या झालेल्या अपघातात ट्रकमध्ये असलेले सागर सुरेश सुरवाडे ( वय २३) व राहुल महेंद्र गजरे (वय २१) या दोन्ही मजूरांचा ट्रक खाली दाबले गेल्याने जागीच मृत्यू झाला. याबाबत रावेर पोलिस स्थानकात योगेश रविंद्र गजरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रक चालकाविरुध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात घडल्यानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले. घटनास्थळी रात्री पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी भेट दिली. पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक हे करीत आहे.

Protected Content