दुदैव : कांताई बंधाऱ्यात तरूणाचा बुडून मृत्यू

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गणपती विसर्जनासाठी गेलेल्या समता नगरातील तरूणाचा कांताई बंधाऱ्यात बडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घडना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील ही तिसरी घटना आहे.

भगवान नामदेव राठोड (वय-१८) रा. समता नगर जळगाव असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान राठोड हा आपल्या आई व मोठा भाऊ यांच्यासोबत समता नगरात वास्तव्याला होता. भावासोबत बांधकामाचे स्टाईल बसविण्याचे काम करत होता. शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास समता नगरातील गणेश मंडळाच्या गणपती विसर्जनासाठी मंडळाच्या तरूणांसोबत गिरणा नदिवरील कांताई बंधारा येथे गेला होता. यावेळी तरूणासांबत भगवान देखील पाण्यात उतरला. दरम्यान, त्याला पाण्याचा अंदाज न असल्याने वाहत्या पाण्यात पाय घसरून पडला. यावेळी उपस्थित तरूणांनी आरडा ओरड केली परंतू तोपर्यंत त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. त्याला पाण्याच्या बाहेर काढून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. मयताच्या पश्चात आई, मोठा भाऊ विष्णू, दोन विवाहित बहिण असा परिवार आहे.

Protected Content