कांचन नगरात तरूणीची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कांचनगरातील तरुणीने राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी शनिपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील कांचनगर परिसरातील कांलिका माता मंदिराजवळील रहिवासी तेजश्री राजेंद्र चौधरी (वय-23) या तरुणीने आपल्या राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना रविवारी 6 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 वाजेपूर्वी घडली. ही घटना कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्या महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. परंतु यापूर्वी त्या महिलेचा मृत्यू झाला होता. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी राहुल पाटील, राहुल घेटे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र पाटील हे करीत आहे.

Protected Content