महावितरण विरोधात जलील पटेल यांचे उद्या उपोषण

यावल प्रतिनिधी | महावितरण हे शेतकरी आणि ग्राहकांची अडवणूक करत असल्याचा आरोप करून याच्या निषेधार्थ कॉंग्रेस सेवा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांनी उद्या यावल येथील महावितरणच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.

कॉंग्रेस सेवा फाऊंडेशनचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून आपली उपोषणाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. यात म्हटले आहे की, महावितरण कंपनीच्या हुकुमशाही व भोंगळ कारभारामुळे आदीच कोरोना संकटामुळे सर्वसामान्य माणुस हा आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या संपूर्ण देशात आणि राज्यात कोरोना काळ असल्याने सामान्य जनता शेतकरी, शेतमजूर,दलित, आदिवासी, या सहित सर्वच घटकांच्या लोकांना रोजगार नाही, हाताला काम नाही. त्यात इमाने इतबाराने काबाळ कस्त करून लोक पोट भरत असून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे काही अधिकारी आणि कर्मचारी हुकमशाही करून जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात दबंगगिरी करून सामान्य जनतेचे १०० टक्के विजबिल चे पैसे भरा अन्यथा तुमचे वीज कनेक्शन कट करू असा दम भरत आहेत.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, अनेक वर्षानुवर्षे नेहमी नियमित वीज भरणा करणार्‍या जनतेचेही वीज कनेक्शन कट करत असून आणि वीज व्यवस्थापनात अनिमियतता व वारंवार भारनियमन ( लोडशेडींग ) करून वीजबिल सक्तीची वसुली करण्यात येत आहे. तसेच वीज बिल न भरल्यास विज कनेक्शन कट करण्याची धडक मोहीम राबवत असून या महावितरणाच्या गोंधळलेल्या मोहीमेत सर्व सामान्य जनता भरडली जात आहे. ही कार्यवाही त्वरीत न थांबल्यास आपण दि. २७ जुलै २०२१ मंगळवार रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या यावल येथील कार्यालया समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा जळगाव जिल्हा कॉंग्रेस ग्रामीण सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष तथा कोरपावली गावचे माजी सरपंच जलील सत्तार पटेल यांनी दिला आहे. या संदर्भातील माहीती ही निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री ना. नितिन राऊत तथा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष महाराष्ट्र नाना पटोले यांना पाठविण्यात आली आहे.

Protected Content