वकील दाम्पत्याच्या निर्घृण हत्येचा यावल तालूका वकील संघातर्फे निषेध

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे पक्षकाराकडून झालेल्या वकील अॅड. राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी अॅड मनिषा आढाव या दाम्पत्यांची निघृण हत्या करण्यात आल्याच्या निषेर्धात यावल येथे तालुका वकील संघाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आले. वकील संघाचे तालुका अध्यक्ष अॅड सिद्धार्थ लोंढे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात वकीलांच्या शिष्ठ मंडळाने तहसीलदार यांना निवेदन देऊन सदरचा गुन्हा फास्ट ट्रेक कोर्टात दाखल करून अॅड. उज्वल निकम यांच्याकडून खटला चालविण्यात यावा व अशा प्रकारे जर वकीलांवर प्राणघातक हल्ले झाले तर वकील बांधवांना योग्य प्रकारे न्यायलयीन काम करणे हे शक्य होणार नाही.

त्यांना नेहमीच भीतीच्या वातावरणात काम करावे लागणार आहे. २५ जानेवारी रोजी वकील दाम्पत्यांचा खून करणाऱ्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना कडक शासन व्हावे तसेच अॅडव्हकेट प्रोटेक्शन बिलास तात्काळ मंजुरी देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन यावल येथे निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी यावल तालुका वकिल संघाचे तालुका अध्यक्ष अॅड सिद्धार्थ आर लोंढे, सचिव अॅड याकुब तडवी, अॅड शामकांत कवडीवाले, अॅड नितिन चौधरी, अॅड विनोद परतणे, अॅड खालीद शेख, अॅड किशोर सोनवणे, अॅड धिरज चौधरी, अॅड आकाश चौधरी, अॅड निवृती पाटील, अॅड यशवंत दाणी, अॅड शेखर तडवी, अॅड सुलताना तडवी, अॅड स्मिता कवडीवाले, अॅड डिपंल सुरळकर, अॅड स्वाती पाटील, अॅड टितेश बारी, अॅड भुषण महाजन यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .

 

Protected Content