तुम्ही चार दिवस कुठे होता? ; पूरग्रस्तांनी महाजन आणि देशमुखांना घेरले

 

mahajan

 

सांगली (वृत्तसंस्था) तुम्ही चार दिवस कुठे होता? प्रशासनाने मदत पोहोचवण्यास उशीर का केला?, असे संतप्त सवाल करत पूरग्रस्तांनी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांना घेरले. आज पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले असताना दोन्ही मंत्र्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

 

मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापुरात महापूर आला. परिणामी हजारो लोक अनेक दिवसांपासून पुराच्या पाण्यात अडकले आहेत. परंतु या लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यात प्रशासनाकडून दिरंगाई झाली आहे. तसेच बचावकार्यासाठी बोटींची संख्याही कमी असल्याने हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकून आहेत, असा आरोप करत आज स्थानिकांनी ना.गिरीश महाजन आणि ना.सुभाष देशमुख यांना घेरले. “तुम्ही यात्रा काढत आहात, तुमची यंत्रणा चुकीची आहे, आम्हाला यांची मदत नको, आम्ही सक्षम आहोत,” अशी उद्विग्न प्रतिक्रियाही ग्रामस्थांनी दिली आहे.

Protected Content