भुसावळ, प्रतिनिधी | शहरात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दिवसाढवळ्या पथदिवे सुरू असल्याने याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महावितरणच्या गलथान कारभारामुळे एकीकडे सामान्य माणसाला न परवडणारी अवाजवी विज बिले भरावी लागत आहेत. त्याचवेळी दुसरीकडे विजेची अशी नासाडी केली जात आहे. या प्रकारची नागरिकांमध्ये संतप्त चर्चा असून विजेची ही नासाडी थांबवण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.