विहीर मंजुरीसाठी अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करू ; ना. गिरीश महाजन

WhatsApp Image 2019 06 13 at 8.56.37 PM

 

जामनेर (प्रतिनिधी) विहिरींच्या योजनेत लाभार्थ्यांनी कुणाशीही आर्थिक व्यवहार केल्यास अशा लाभार्थ्यांच्या विहीरी नामंजूर करण्यात येतील असे ना.पालकमंत्री गिरीष महाजन यांनी आज त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

तालुक्यातील एमआरजीएस योजने अंतर्गत ३००० हजार विहिरींचा लाभ लाभार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती यावेळी ना. महाजन यांनी दिली. विहिरींच्या मंजुरीबाबत कोणत्याही संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांनी आर्थिक देवाण घेवाणीसाठी अडवणूक केल्यास त्यांच्याकडे वैयक्तिक त्याची तक्रार करा.त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर,जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, जे.के.चव्हाण यावेळी उपस्थित होते. दरम्यान, पत्रकारांच्या वतीने त्यांचे पालकमंत्री म्हणून अभिनंदन करण्यात आले.

Protected Content