विद्यापीठ परीक्षेचे हॉलतिकीट डाऊनलोड होईनात

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगावातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षाच्या विद्यापीठाच्या परीक्षा दि. ८ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होत असून त्यासाठी लागणारे प्रवेश पत्र हॉल तिकीट अद्यापही विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले नसून विद्यापीठाच्या वेबसाईटवर अपलोड होत नसून यात महाविद्यालय, विद्यापीठ प्रशासनाची चूक विद्यार्थ्यांना महागात पडू शकते. त्यात त्यांचे शैक्षणिक,आर्थिक, मानसिक सर्वच प्रकारचे नुकसान झाल्यास त्या महाविद्यालय व विद्यापीठ कारणीभूत राहील यासंदर्भात जळगाव जिल्ह्याचे रावेर लोकसभेचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी काही महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी व विद्यापीठाच्या वेबसाईटवर ई-मेलवरून विद्यापीठात तक्रार दाखल केली आहे.

लवकरात लवकर विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेश पत्र मिळवून देणे आवश्यक आहे अन्यथा त्या होणाऱ्या नुकसानास विद्यापीठ जबाबदार राहील यावल तालुका हा सातपुडाच्या पायथ्याशी येत असल्याने यात दुर्गम भागातून विद्यार्थी या परिसरात प्रवेश घेतात व त्यांना प्रवेश पत्रच उशिरा मिळाले किंवा न मिळाल्यास त्यांचे नुकसान होऊ शकते याची दखल घेत राकेश सोनार यांनी यावल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्याशी संपर्क करून विद्यापीठात पाठपुरावा करण्याची विनंती केली तसेच स्वत: देखील कुलगुरू उपकुलगुरू कवित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्याशी ईमेलच्या माध्यमातून तक्रार देखील केली आहे

Protected Content