तोल जावून विहीरीत पडल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील जानवे गावातील ३२ वर्षीय तरूणाचा गावातील विहीरीत तोल जावून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवार २१ जुलै रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तानकु सुरेश पारधी वय ३२ रा. जानवे ता. अमळनेर असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील जानवे गावात तानकु पारधी हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होता. खासगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. रविवारी २१ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावातील विहिरीजवळ तानकु पारधी हा उभा होता. त्यात त्याचा तोल गेल्याने त्यांच्या विहीरीत पडून दुदैवी मृत्यू झाला. गावातील ग्रामस्थांनी तातडीने जमा होवून त्याला विहिरीतून बाहेर काढून अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ कैलास शिंदे हे करीत आहे.

Protected Content