विजेचा धक्का लागल्याने भुसावळात दोघा तरूणांचा मृत्यू

भुसावळ प्रतिनिधी । डिजीटल फ्रेम घेऊन जातांना याचा उच्च दाबाच्या तारांना स्पर्श झाल्याने दोघा तरूणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज येथे घडली.

याबाबत वृत्त असे की, शहरातील श्रद्धा नगरातील श्री गजानन महाराज मंदिरावरून १३२ केव्हीची लाईन गेली असुन त्या खालीच क्लिअरन्स मेंटेनन्स करण्यासाठी ११ केव्हीची वाहीनी गेली आहे. आज दुपारी दोन युवक दुचाकीवर डिजिटल प्रेम घेऊन जात असताना अकरा केव्ही वहिनीला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विद्युत वहीला स्पर्श झाल्याने शुभम गजानन वानखेडे (वय २० राहणार श्रद्धा नगर) व राजेश मंगलदास देवगिरे (रा. श्रद्धा नगर) या दोघा युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा निषेध व्यक्त केला जात आहे.

Protected Content