रोटवद येथे विजेचा शॉक लागून दोन जनावरे दगावली

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील रोटवद येथे विजेचा शॉक लागून गाय व बैल दगावल्याची घटना घडली आहे.

सकाळी नारायण जाधव यांची गाय दगावली तर त्याच ठिकाणी संध्याकाळी कैलास दांडगे यांचा बैल शॉक लागून मृत्युमुखी पडला आहे. सदरील घटनेला महावितरण कंपनी व त्यांचे अधिकारी जबाबदार असल्याची चर्चा नागरिक करतांना दिसून येत होते. याठिकाणी या अगोदर देखील घटना घडल्या असून माणसाची जीवितहानी होण्याची वाट महावितरण कंपनी पाहत आहे का ? असा संतप्त प्रतिक्रिया यावेळी नागरिक देत होते.

तसेच घटनेची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ मनोहर पाटील यांना मिळताच त्यांनी जामनेर तालुका शिवसेना पदाधिकारी ॲड भरत पवार( माजी युवासेना उपजिल्हा प्रमुख) अरुण पाटील(उप तालुका प्रमुख) पंढरी शिंदे (गण प्रमुख ) ईश्वर चोरडिया (शिवसेना जामनेर तालुका कार्यकारिणी सदस्य) , मुकेश जाधव (युवासेना तालुका मिडिया प्रमुख), प्रकाश सुर्यवशी व शिवसैनिक उपस्थित होते ,यांनी पाहणी करत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ मदत देण्याची मागणी करत. रात्री उशिरा पर्यंत लगेच गुरांचे डॉ जावळे व रवी बिजोटे यांनी वैद्यकीय हवाल तयार करून वरिष्ठांना पाठवला.

Protected Content