भरधाव कारच्या धडकेत तीन जण जखमी

जळगाव  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव जाणाऱ्या कारने पॅजो रिक्षा आणि दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना नशिराबाद टोल नाक्याजवळील रेल्वे उड्डाण पुलावर घडली. याबाबत रविवार ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता अज्ञात कार चालकाविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नशिराबाद पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव ते भुसावळ रस्त्यावरील नशिराबाद गावच्या पुढे असलेल्या टोल नाकाजवळील रेल्वे उड्डाणपुलावर कार क्रमांक (एमएच १९  सीव्ही ७०५५) वरील चालकाने पुढे जात असलेल्या रिक्षा (एमएच १९ बीएम ५९९२) आणि दुचाकी क्रमांक (एमपी ४६ एमटी २७९९) यांना मागून जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षामधील शेख अलीमुद्दीन शेख यासीन रा. शिवाजी नगर, जळगाव यासह दुचाकीस्वार व  महिला असे एकूण ३ जण गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर कारचालक हा घटनास्थळाहून पसार झाला होता. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या घटनेबाबत रविवार ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात शेख अलीमुद्दीन शेख यासीन यांच्या फिर्यादीवरून कार क्रमांक (एमएच १९ सीव्ही ७०५५) वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय जाधव करीत आहे.

 

Protected Content