तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू

Crime

जळगाव प्रतिनिधी । विदगावच्या बाजारात जावून येतो असे सांगून घरातून निघालेल्या तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे आज सकाळी 6 वाजता उघडकीस आले. याप्रकरणी जळगाव ग्रामीण पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, सिताराम भावसिंग बारेला (वय-19) रा. डिगासाई ता.जळगाव हा मिळेल ते काम करतो. त्याचे आईवडील आणि  चार भाऊ देखील तेच काम करत असतात. विदगावचा मंगळवारचा बाजार असल्यामुळे बाजारातील एखाद्या दुकानावर काम करत असतो.  सोमवारी 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता वडीलांना बाजारात जातो असे सांगून घराबाहेर पडला होता. दोन दिवसानंतर तो घरी परत  न आल्याने नातेवाईकांची चिंता वाढू लागली. त्यांनी त्याचा शोधाशोध सुरू केला. त्यानंतर आज गुरूवार सकाळी 6 वाजता त्यांचा मृतदेह  डिगसाई गावात तापी नदीत मृतदेह आढळून आल्याने परीसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान त्याची ओळख पटली असून मृतदेह जिल्हा  वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी जळगाव ग्रामीण पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली  असून पुढील तपास सहाय्यक फौजदार मगन मराठे करीत आहे.

Protected Content