अमळनेरातील कस्तूरबाग नगरात दीड महिन्यापासून पाणीपूरवठा नाही; नागरिकांचे हाल

अमळनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर येथील मुंदडा नगरजवळील कस्तुराबाग नगर मध्ये गेल्या दीड महिन्यापासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. घरात पिण्याचे नाही म्हणून पाण्यासाठी कॉलनीवासीयांना अक्षरशः हंडे व ड्रम घेऊन शहरात इतरत्र वणवण फिरावे लागत आहे.

नगरपालिकेत वारंवार तक्रार करूनही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने येथील नागरिक व महिला येथील पाण्याच्या टाकीवर एकत्र आले होते. सध्यस्थीतीत पावसाळ्याचे दिवस आहेत. घरात साठवलेला पाणी साठा जास्त दिवस झाल्याने मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

नगरपालिकेत याबाबत तक्रार केल्यावर उडवा उडविचे उत्तर दिले जाते.गेल्या दीड महिन्यापासून पाण्याची समस्या असून नगरपालिकेत जबाबदार अधिकारी यांना सांगूनही समस्या सुटत नसेल तर येथील संतप्त महिला हंडा मोर्चा घेऊन येणार असल्याचे सांगितले जातं आहे.

Protected Content