रायपुर कुसुंबा येथून बेपत्ता झालेला तरूण नातेवाईकांच्या स्वाधीन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथील तरूण बेपत्ता झाला होता. एमआयडीसी पोलीसांनी आज गुरूवार, दि. ४ ऑगस्ट रोजी दुपारी शोधून आणत त्याला नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहे.

अमरिष दास रा. रायपूर कुसुंबा ता.जि.जळगाव असे तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “अमषिद दास हा आपल्या कुटुंबियांसह जळगाव तालुक्यातील रायपूर येथे राहतो. काही दिवसांपासून त्याच्या मनावर परिणाम झाल्याने कुणाला काहीही न सांगता बुधवारी ३ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता घरातून निघून गेला होता. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतू तो कुठेही आढळला नाही.

गुरूवार, दि. ४ ऑगस्ट रोजी नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी इम्तीयाज खान यांनी या तरूणाला मास्टर कॉलनी, जळगाव येथून शोधून आणत त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्या नातेवाईकांनी पोलीसांचे आभार व्यक्त केले.

Protected Content