निवडणूकीत पराभव झाल्याच्या रागातून महिलेला शिवीगाळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आमोदा गावात ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्याच्या कारणावरून एका महिलेला शिवीगाळ करत तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता घडला आहे. याप्रकरणी सायंकाळी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आमोदा गावात कल्पनाबाई सुभाष सूर्यवंशी (वय-५६ रा. आमोदा ता.जि.जळगाव) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान नुकतेच आमोदा ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीत विनोद रघुनाथ सूर्यवंशी याचा पराभव झाला, आपला पराभव हा कल्पनाबाई सूर्यवंशी यांच्यामुळे झाल्याचा राग मनात ठेवून विनोद सूर्यवंशी याने महिलेला शिवीगाळ करून तिच्या पतीला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.  या संदर्भात महिलेने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात नाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी विनोद रघुनाथ सूर्यवंशी यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बापू पाटील करीत आहे.

Protected Content