भर पावसात बर्निंग कारचा थरार !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील अजिंठा चौफुली येथील हॉटेल मानस समोर उभ्या असलेला कारने बुधवारी ५ जुलै रोजी रात्री अकरा वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली होती. अग्निशमन दलाच्या जवानांकडून ही आग विझविण्यात आली.

जळगाव शहरातील अजिंठा चौक जवळील हॉटेल मानससमोर बुधवार ५ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास उभे असलेल्या कारणे अचानक भेट घेतला. ही आग भर पावसात लागल्याने अग्निशामक दलाला संपर्क करण्यास विलंब झाला, मात्र काही वेळानंतर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी आल्यावर आग नियंत्रणात आणण्यास त्यांना यश आले. मात्र तोपर्यंत ही उभी असलेली कार संपूर्णतः जळून खाक झाली होती. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या कारला आग नेमकी कशी लागली हे मात्र कळू शकले नाही. या घटनेबाबत पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती

Protected Content