
जळगाव प्रतिनिधी । रागाच्या भरात घर सेाडून मुंबईकडे निघालेल्या तिघा अल्पवयीन बालकांना लोहमार्ग पेालिस आणि समतोल संस्थेच्या माध्यमातुन ओळख पटवुन त्यांच्या पालकांना सोपवण्यात आले.

पोलिस नाईक सचिन भावसार, पुराणीक अशांनी रेल्वेस्थानकावर भटकणाऱ्या या तिघा मित्रांना हटकले. चौकशी केल्यावर तिघेही रेल्वेत बसुन गाव सोडण्यापुर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आले. कादेशीर प्रक्रियेनंतर त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.


