मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसरा टप्प्याला 21 ऑगस्टपासून सुरुवात

EBCbZ6oWkAAYvN3

 

सोलापूर (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपची महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 21 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या यात्रेची सुरुवात नंदुरबार येथून होणार आहे तर समारोप 31 ऑगस्टला सोलापूर येथे होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रा पुन्हा सुरु होणार असून ही यात्रा 31 ऑगस्टपर्यंत राज्यात 1,839 किमी प्रवास करणार आहे. 21 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत ही यात्रा सुरु राहील. राज्यात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे जनादेश यात्रा पाच दिवस उशिरा नंदुरबार येथून यात्रा सुरू होईल. महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्हे आणि 55 मतदारसंघ आहेत. यामध्ये 39 जाहीर सभा होणार आहेत तर 50 स्वागत सभा होणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यात ही यात्रा 1839 किमी प्रवास करणार आहे. दुसऱ्या टप्प्याचा समारोप 31 ऑगस्टला सोलापूर येथे होणार आहे. महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा गणेशोत्सव संपल्यावर सुरु होणार असल्याची माहिती भाजप नेते आणि महाजनादेश यात्रा प्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली आहे.

Protected Content