हॉटेलमधील तरुण आचाऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । हॉटेलमध्ये आचारीचे काम करणाऱ्या २८ वर्षीय तरूणाने हॉटेलमध्ये रबरी नळीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जितेंद्र रमेश पाटील (वय-२८) रा. चाळीसगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जितेंद्र पाटील हा जळगावात अजिंठा चौकात असलेल्या महाराजा हॉटेलमध्ये आचारी म्हणून फेब्रुवारी २०२१ पासून कामाला आहे. दरम्यान १५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री जितेंद्र पाटील याने मध्यरात्री कम्पाऊंटच्या आवारात अँगलचा रबरी नळीने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार आज सोमवार १६ ऑगस्ट रेाजी सकाळी ६ वाजता उघडकीला आला. आत्महत्या करण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. मृतदेह खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा भोळे यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ रतीलाल पवार आणि स्वप्निल पाटील करीत आहे. मयत जितेंद्र पाटील यांच्या पश्चात दोन भाऊ, आई, दोन बहिणी असा परिवार आहे.

 

Protected Content