जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । काहीही कारण नसतांना मध्यरात्री दोन जणांनी शिवीगाळ करून घरावर दगडफेक करून दोन दुचाकीचे नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, निलीनी विलास तायडे (वय-५०) रा. गाडगे बाबा चौक जळगाव हे आपल्या दोन मुले व सुनांसह वास्तव्याला आहे. घरातील मुले व सुना हे नातेवाईकांच्या घरी लग्नासाठी बाहेरगावी गेले आहे. दरम्यान, बुधवारी २७ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास नलीनी तायडे ह्या घरी एकट्या असतांना आबा आणि आश्विन (पुर्ण नाव माहित नाही) यांच्यासह इतर दोन ते तीन जण घरासमोर येवून दगडफेक केली तर त्यांच्या घरासमोर पार्क केलेल्या दोन दुचाकीचे तोडफोड केल्याची घटना घडली. यावेळी नलीनी तायडे यांचे दोन्ही मुले विनोद आणि सतिश यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पहाटे ३ वाजता रामानंद नगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी आबा व आश्विन यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.