कर्जाने त्रस्त शेतकर्‍याने केले असे काही. . .परिसरावर शोककळा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सावखेडा सीम या गावात एका कर्जबाजारी शेतकर्‍याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटनासमोर आली असून यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की अनिल प्रकाश पाटील, राहणार सावखेडा सिम यांच्यावर अडीच लाखापर्यंत कर्ज झाले होते.दरम्यान या कर्जबाजारीमुळे ते त्रस्त झाल्याचे दिसून येत होते. दरम्यान दिनांक २ जून पासून घरात कोणाला काही एक न सांगता ते निघून गेले होते. यानंतर शिवारातील कादर मोहम्मद तडवी यांचे शेतातील विहिरीत अनिल पाटील हे मृत अवस्थेत आढळून आले.

मोहम्मद तडवी हे त्यांचे शेतातील गेल्या अनेक दिवसापासून व बंद असलेले विजपंप सुरू करण्यास गेले असता त्यांना विहिरीतून दुर्गंधी आली. त्यांनी विहिरीत डोकावून बघितले असता अनिल पाटील यांचे प्रेत आढळून आले. ही खबर पोलीस पाटील,पंकज बडगुजर यांना दिली असता त्यांनी यावल पोलिसात कळविले.

यानुसार यावल पोलिसांनी त्यांचा मृतदेह विहिरी बाहेर काढून यावलच्या ग्रामीण रुग्णालयात डॉप्रशांत जावळे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. यावल पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ, हेड कॉंस्टेबल राजेंद्र पवार,वसीम तडवी आणि सहकारी करीत आहेत. आत्महत्या केलेल्या अनिल पाटील यांच्या कुटुंबात पत्नी दोन भाऊ मुलगा मुलगी आई असा परिवार आहे.

Protected Content