नियंत्रण रेषेजवळ धुमश्‍चक्री ; ४ पाकिस्तानी सैनिक ठार

Indian Army

पुंछ वृत्तसंस्था । पाकिस्तानने सीमेपलीकडून केलेल्या शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराच्या जवानांनी सडेतोड उत्तर देत पाकिस्तानच्या चार सैनिकांना ठार केले आहे. ही घटना पुंछ-राजौरी सेक्टर येथील नियंत्रण रेषेजवळ घडली असून नियंत्रण रेषेनजिक राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पुंछ-राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून अचानक गोळीबार सुरु झाला. प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर तोफगोळे डागत, तुफानी गोळीबार केला. यात पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले. या पूर्वी बुधवारी पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला होता. या नंतर जर नियंत्रण रेषेवर एकजरी भारतीय जवान शहीद झाला, तर त्या बदल्यात पाकिस्तानचे तीन सैनिक मारले जातील असे भारतीय लष्कराने स्पष्ट केले होते.

Protected Content