राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे – हसन मुश्रीफ

कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सामाजिक न्यायाचे प्रणेते, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना ‘भारतरत्न पुरस्कारा’ने सन्मानित करावे, अशी मागणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज बुधवारी पालकमंत्री मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस येथील राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी त्यांनी हि माहिती दिली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनीही राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जयंत आसगावकर, जयश्री जाधव, ऋतुराज पाटील हे आमदार, महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, राजर्षी शाहू प्रेमी,मान्यवर उपस्थित होते.

Protected Content