कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे केवळ 40 आमदार निवडून येतील : गिरीश महाजन

girish mahajan

 

मुंबई (वृत्तसंस्था) विधानसभा निवडणुकीत आघाडीचे केवळ 40 आमदार निवडून येतील, अशा आशयाची भविष्यवाणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वर्तवली आहे. ते एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.

एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात बोलताना ना. महाजन म्हणाले की, काँग्रस म्हणजे वादळात भरकटलेले जहाज आहे. त्यामुळे भाजपमध्ये यावे ही सर्वांची इच्छा आहे. परंतू नवीन लोक पक्षात घेतांना स्थानिक कार्यकर्त्यांना आम्ही विश्वासात घेतोय. आताच्या घडीला आघाडीचे 50 हून अधिक आमदार आमच्या संपर्कात आहेत. दुसरीकडे शिवसेना-भाजप एकत्र निवडणूक लढवणार,असल्याचे गिरीश महाजन पुन्हा एकदा स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर, जागां वाटपांचा निर्णय मुख्यमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शाह घेतील,असेही त्यांनी सांगितले.

Protected Content