जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी गारपीट देखील झाली. या नैसर्गिक आपत्तीचा फटका जळगाव एमआयडीसीतील कंपन्यांनाही बसला आहे. वादळामुळे कंपन्यांच्या पत्र्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले, तसेच पावसामुळे लाखो रुपये किमतीच्या मशिनरीमध्ये पाणी शिरल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
एमआयडीसीमधील त्रिमूर्ती सीट मेटल सोल्युशन आणि प्लास्टिक दाणे बनवणाऱ्या कंपन्यांना या वादळाचा मोठा फटका बसला आहे. या कंपन्यांमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेल्या लाखो रुपयांच्या मशिनरीमध्ये पाणी गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. कंपनी मालक आता हतबल झाले असून, त्यांनी शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
प्लास्टिक दाणे उत्पादक कंपनीचे मालक भीमसिंह पाटील आणि त्रिमूर्ती सीट मेटल सोल्युशनचे मालक हरीश पाटील यांनी जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलताना सांगितले की, या अवकाळी पावसामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांनी शासनाला तातडीने नुकसानीची पाहणी करून भरपाई देण्याची मागणी केली आहे.