लक्ष्मीनगरातील विवाहिता दोन मुलांसह बेपत्ता

जळगाव प्रतिनिधी । शहरातील लक्ष्मी नगरातील ३५ वर्षीय विवाहिता दोन मुलांसह बेपत्ता झाल्या आहेत. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र शिवाजी सगरे (वय-४०) रा. लक्ष्मी नगर जळगाव हे पत्नी कविता जितेंद्र सगरे (वय-३५), मुलगी जयश्री (वय-९) आणि मुलगा रोहित (वय-१२) यांच्यासह वास्तव्याला आहे. जितेंद्र सगरे हे मिस्त्री काम करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी २० डिसेंबर रोजी सकाळी ४ वाजता जितेंद्र सगरे यांची पत्नी कविता ह्या कुणालाही काहीही न सांगता मुलगी जयश्री आणि मुलगा रोहित यांच्या सोबत बेपत्ता झाल्या आहे. जितेंद्र सगरे यांनी पत्नी व दोन्ही मुलांचा नातेवाईक व ओळखीच्या नागरीकांकडे शोधाशोध केली परंतू कुठेच आढळून आलेले नाही. विवाहितेचा हिन्दी, पावर व अहिराणी भाषा बोलता येते.  सोमवारी २७ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता जितेंद्र सगरे यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद केली केली आहे. पुढील तपास  पोलिस नाईक सिकंदर तडवी तपास करत आहेत.

Protected Content