महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन २७ जूनला

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीच्या निकालाची धामधूम अजूनही सुरू आहे. लोकसभेच्या निकालामुळे सत्ताधारी महायुतीमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये पावसाळी अधिवेशनाबाबत घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या २७ जून रोजी पार पडणार आहे.

राज्याचे पावसाळी अधिवेशन १० जून रोजी होणार होते, मात्र आता हे अधिवेशन २७ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अधिवेशन दोन आठवड्याने पुढे ढकलण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये चारा छावणी व पाणी टंचाई यावर देखील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाली. सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीबाबत माहिती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते.

विधिमंडळाचे १० जूनपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. विधान परिषदेच्या ४ जागांची निवडणूक संपल्यानंतर म्हणजे जुलैमध्ये हे अधिवेशन होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याच महिन्यात २८ तारखेला पावसाळी अधिवेशन घेण्याची घोषणा करण्यात आली. लोकसभा निवडणूक पार पडल्याने आचारसंहिता संपली आहे. मात्र राज्यात विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांकरिता निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या या भागात आचारसंहिता कायम राहणार असल्याने अधिवेशन पुढे ढकलण्यात आले.

Protected Content