महाराष्ट्राला मिळाला ई-पंचायतराज पुरस्कार

 

मुंबई प्रतिनिधी- केंद्र शासनाने ई-पंचायत पुरस्कार– २०२०  चा तृतीय पुरस्कार देऊन महाराष्ट्र राज्याचा गौरव केला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा पुरस्कार स्विकारला.

आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून ई-पंचायत क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने दरवर्षी भरीव कामगिरी केली असून यावर्षी देखील ही उज्वल परंपरा पुढे चालू ठेवली आहे. याची पोचपावती म्हणून केंद्र शासनाने ई-पंचायत पुरस्कार – २०२०  चा तृतीय पुरस्कार देऊन महाराष्ट्र राज्याचा गौरव केला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी  तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने हा पुरस्कार स्विकारला. ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंदकुमार, उपसचिव प्रविण जैन उपस्थित होते.

ई-पंचायत क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या देशातील 3 राज्यांना दरवर्षी ई-पंचायत पुरस्कार देण्यात येतो.

Protected Content