भाजपातर्फे शिवकॉलनीत ‘हर घर तिरंगा’ अभियानाला सुरूवात

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवकॉलनी परिसरात हर घर तिरंगा अभियानाला सुरूवात करण्यात आली.

यंदाचे वर्ष हे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. केंद्र सरकारच्या आदेशान्वये हर घर तिरंगा अभियान राबविण्याच्या सुचना देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शिवकॉलनी परिसरात भारतीय जनता पार्टीच्या मंडळ क्रमांक ६ वतीने हर घर तिरंगा हा अभियान राबविण्यात आले. यावेळी मोफत तिरंगाचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी शिवकॉलनी शक्तीकेंद्र प्रमुख मनोज भाडांरकर, मंडळ अध्यक्ष अजित राणे, शिंपी समाज अध्यक्ष राजेंद्र जगताप, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख मनोज भांडारकर, शोशल मिडीया प्रमुख अक्षय चौधरी, प्रभाग समिती सदस्य बंटी नेरपगार, जितेंद्र शिंपी, वैशाली भांडारकर, सुरेखा सोनार, विद्या सोनवणे, विमल महाजन, सुधाकर सोनवणे, मिलिंद सोनवणे, चार्ली शिंपी, निलेश चव्हाण, सुधाकर कापुरे, योगेश शिंपी, संजय निकुंभ, शिवदास शिंपी, चेतन खैरनार, सुमित अहिरराव, गणेश सोनवणे यांच्यासह शिवकॉलनी परिसरातील नागरीक व महिला उपस्थित होत्या.

Protected Content