मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकल्या कडकनाथ कोंबड्या ; स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन

fadanvis

सांगली (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतील ताफ्यांसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कडकनाथ कोंबड्या फेकत आंदोलन केले. या आंदोलनामुळे पोलीस यंत्रणेची मात्र, प्रचंड धावपळ उडाली.

 

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटना सध्या राज्यात गाजत असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी आरोप असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी करत आहे. तसेच पूरग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, दूध सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला पाणी द्यावे, या मागणींसाठी हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या आंदोलनाचे समर्थन केले आहे.

Protected Content