दोन तरुणांशी लग्न करून फसवणूक करणारी तरुणी ताब्यात

 

taruni

धरणगाव प्रतिनिधी | तालुक्यातील दोन युवकांना एका तरुणीने लग्न करून त्यांची फसवणूक केल्याची खळबळ घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, त्या तरुणीला धरणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील बोरगाव येथील रवींद्र सुरेश पाटील यांच्याशी दि. २५ सप्टेंबर रोजी लता मंगेशकर रोड, भीमनगर इसाननी नागपूर येथे राहणाऱ्या आंचल नामक मुलीशी विवाह झाला. काही दिवसांपासूनच तिच्या वागणुकीवर संशय आला असून ती आज घरातील दागिने व पैसे घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असतांना पाटील कुटुंबाने तिला पकडले आणि धरणगाव पोलिस ठाण्यात नेले. यावेळी त्या तरुणीने आपले नाव संगिती असल्याचे सांगितले. याआधी तिने धरणगावातील सचिन सुभाष वाघ यांच्याशी ३ ऑगस्ट २०१९ रोजी लग्न केल्याचे माहिती समोर आली आहे.
अशा प्रकारे फसवणूक करणार्‍या टोळीची ती सदस्य असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. तर या टोळीतील राजू कोतले, निशांत पटुले आणि अंकुश पटुले हे फरार झाल्याचे वृत्त आहे.

Protected Content